20250930 Bangladesh's Chicken Neck & Seashore for NE India
FaceBook | Kaunteya Desh | September 30, 2025 १९४७ साली फाळणीच्या वेळेस काँग्रेस नेतृत्वाची सगळी अक्कल काय खात होती हा प्रश्नच आहे. आताही तीच परिस्थिती आहे म्हणा - पण ते असो. फाळणी म्हटली की आपण पाकिस्तान , काश्मीर , कबालिए , युनोची घोडचूक ... या सगळ्या ट्रॅकवर जातो. पण पूर्वेला बंगाल बाबतीत काय गमावलं ... काय कमरेचं काढून दिलं हे लक्षात घेत नाही. त्रिपुरा राज घराण्यातल्या प्रद्योत देववर्मा यांची स्मिता प्रकाशांसोबतची मुलाखत पाहिली आणि तिथल्या भूराजकीय आव्हानाची तीव्रतेने आठवण झाली. बांग्लादेशचा नीच शासक महंमद युनुसने दोन महिन्यांपूर्वी चीनमधे जाऊन - (१) पूर्ण ईशान्य भारत हा भाग लँड लॉक्ड आहे , ( २) बांग्लादेश व चीनने सिलिगुडी चिकन नेक ताब्यात घेतला तर हा भाग भारतापासून तुटेल - कारण (३) या भागाला बंगालच्या उपसागराचा access नाही अशा अर्थाची बडबड केली. त्यामुळे थोडे परत नकाशात पाहिल्यावर आपल्याला पहिल्यांदा हे समजून आले की मुख्यतः त्रिपुरा , मिझोराम अद्याप भारतात आहेत हा निव्वळ आकाशात देव आहे याचा पुरावा होय. तेव्हा तर सिक्कीमही स्वतंत्र हिंदुस्थानचा भाग नव्हता. मग त्याखालच...